Tuesday, May 26, 2009

भटके विमुक्त आणि बंजारा समाजाचा सोमवारी आझाद मैदानावर मोर्चा!

बंजारा आणि विमुक्त भटक्या समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी सोमवार, ५ जानेवारी रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर बंजारा क्रांती दलाच्या वतीने मोर्चा आयोजित करण्यात आल्याची माहिती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष राकेश जाधव यांनी दिली. भटक्या तसेच बंजारा समाजातील प्रत्येकाला न्याय मिळावा या हेतूने तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी पहिल्या आयोगाची निर्मिती केली होती. या आयोगाच्या सदस्य सचिवपदी खा. हरिभाऊ राठोड यांची नियुक्ती केली होती. राठोड यांच्या नियुक्तीमुळे बंजारा समाजाला न्याय मिळणार असे वाटत होते. तथापि त्यांनी सदस्यपदाचा राजीनामा दिला. यामुळे समाजाचा भ्रमनिरास झाला आणि गेली काही वर्षे नुकसान झाल्याबद्दल जाधव यांनी तीव्र चीड व्यक्त केली. दोन्ही समाजबांधवांच्या हितासाठी नेमलेल्या रेणके आयोगाच्या शिफारसी त्वरित लागू कराव्यात, याशिवाय माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा आणि राज्यातील कृषी विद्यापीठे आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांना स्व. नाईक यांचे नाव द्यावे, संसद भवनासमोर लाखा बंजारा यांचे स्मारक उभारावे या आणि इतर मागण्यांसाठी पारंपरिक वेषभूषेतील ४२ जमातींचे हजारो समाजबांधव मोर्चात सहभागी होणार आहेत. भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचे यावेळी भाषण होणार आहे.

No comments:

Post a Comment

Jai sevalal,Gormati.......I think,you want to write something.