सिका छ ,सीकावा छ, सीके राज घडवा छ,सीको गोरमाटी सिकलो रा, सिक सिक राज पथ चढलो रा,सीके वाळो सिक पर लेल सेवारो रूप रा.---Dr.Chavan Pandit


Headline



Saturday, June 27, 2009

जात-आरक्षण

आजचा सुधारक हे गेली एकोणीस वर्षे नागपुरहून प्रकाशित होते. विवेकवादी विचाराला वाहिलेले चिंतनशील मासिक अशी त्याची थोडक्यात ओळख करुन देता येईल. जात आरक्षण हा तसा संवेनाशिल विषय आहे. याला अनेक पैलू आहेत. तो काळ-पांढर. समर्थन - विरोध, चांगल - वाईट अशा द्विमितीत तो बसवता येणार नाही. पण या विषयाची चर्चा करताना काही संकल्पना पुरेशा स्पष्ट कराव्या लागतात. त्याला व्याख्ये साठी कायद्याच्या चौकटीत बांधाव लागत. मग त्यातुन आपल्याला अनुकुल असे अन्वयार्थ काढणे . एखाद्या इतिहासपुरुषाला वेठीस धरुन आपल्याला वाटणारे अर्थ हे त्या महापुरुषाला अभिप्रेत होते असे सांगुन लोकाश्रय संपादन करणे. सकृतदर्शनी विरोधक वाटणार्‍या प्रतिमेचे फक्त अनुकुल तेवढेच संदर्भ उधृत करणे. गरीब, बेराजगार, अल्पशिक्षित, अपरिपक्व जनतेला हाताशी धरुन त्यांच्यात द्वेषाच्या आधारावर एखादी अस्मितेची नशा निर्माण करायची त्याला 'स्वाभिमान` हे नाव द्यायचं व त्याचा झुंडशाहीसाठी कुशलतेने वापर करायचा हे प्रकार राजकारण असो वा समाजकारण असो यात केले जातात. लोकशाहीतील राजकारण हे केवळ गुंडशाही वर चालणार नाही असे लक्षात आल्यावर अनेक विद्वानांना हाताशी धरुन त्यांच्या करवी बौद्धिक दांडगाई व बौद्धिक कसरती करुन समांतर बौद्धिक दंगली घडवुन आणायच्या हे गोबेल्स चे आधुनिक रुप विवेकवादी विचारश्रेणीचे लोक असहाय्यपणे पहात आहेत. जनतेमध्ये विवेक जागृती करण्याचा प्रयत्न जर त्यांच्या हिताच्या विरोधात असेल तर जनतेचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न करु नये असा इशारावजा धमकी हे लोक देत असतात. यासाठी वाचकांनाच विचारी बनवण्याचा प्रयत्न 'आजचा सुधारक' करत असतो. यासाठी मी सर्वसामान्य लोकांना समजतील अशा वस्तुनिष्ठ बाबी आजच्या सुधारक मध्ये याव्यात अशी विनंती मी वेळोवेळी करत असतो. त्यानुसार आजच्या सुधारक मध्ये जात आरक्षण विशेषांकात हे परिशिष्ट संपादकांनी दिले आहे. आजच्या सुधारक बाबत काही माहिती आपल्याला इथे पहाता येईल.
काही संज्ञांचे अर्थ

१. दलित : उच्च जातीच्या पायाखाली तुडवली गेलेली किंवा उद्ध्वस्त झालेली हिंदू जातिव्यवस्थेमधली सर्वांत खालची जात. पूर्वी ह्या जातींना `अस्पृश्य' मानले जायचे. शासनाने ह्या जातींना `अनुसूचित जाती' असे घोषित केले आहे. काही अभ्यासक दलित ह्या शब्दामध्ये - सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीयदृष्ट्या शोषण झालेल्या गटांचा समावेश करतात; उदाहरणार्थ - दलित, आदिवासी, नव-बौद्ध, भूमिहीन, वेठबिगार, स्त्रिया आणि ख्रिश्चन व मुस्लिम
ह्या धर्मांतील अन्याय झालेल्या जाती.

२. शूद्र-अतिशूद्र : शूद्र म्हणजे स्पृश्य मागासलेली जात. हिंदू जातिव्यवस्थेमधला चौथा वर्ण. मनुस्मृतीच्या कायद्यामध्ये शूद्र जातीने द्विज जातीची म्हणजे उच्च जातीची सेवा केली पाहिजे असे म्हटले आहे. शूद्रांचे काम म्हणजे कारागिरी, मजुरी, सेवा करणे. अति-शूद्र म्हणजे अस्पृश्य ठरवल्या गेलेल्या जाती--दलित जाती. हिंदू जातीच्या व्यवस्थेमधील चार वर्णांच्या बाहेर--बहिष्कृत केलेला वर्ण. महात्मा फुल्यांनी `शूद्र-अतिशूद्र' हा शब्द वापरला होता.

३. अस्पृश्य : उच्च जातीने अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातींतील लोकांना स्पर्श केल्यास जात बाटते, विटाळ होतो, माणूस अशुद्ध होतो असे मानले जात असे. पूर्वीचे अस्पृश्य म्हणजे सध्याचे दलित.

४. हरिजन : शब्दश: अर्थ - ईश्वराची मुले. महात्मा गांधींनी अस्पृश्यांबद्दल वापरलेला शब्द. काही अभ्यासकांच्या मते हा शब्द अप्रतिष्ठेचा, अपमानकारक आहे, सन्माननीय वाटत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनीही ह्या शब्दास प्रखर विरोध दर्शविला होता.

५. आदिवासी : शब्दश: अर्थ - मूळ रहिवासी. हे रहिवासी किंवा जमाती जंगलात आणि दऱ्या-खोऱ्यांत राहिल्यामुळे आधुनिक नागरिकीकरणापासून आणि विकासापासून व शिक्षणापासून वंचित राहिल्या.

६. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (Scheduled Castes and Scheduled Tribes - SC/ST) -- अनुसूचित जाती (Scheduled caste) ही काही एक जात नाही, तर अनेक जातींचा गट आहे, ज्यांच्या समस्या एकसारख्या आहेत आणि त्यांवर उपायही सारखेच आहेत. आरक्षणासाठी आणि विशिष्ट अशा काही कायदेशीर बाबींसाठी `अनुसूचित जाती' हे नाव देण्यात
आले आहे. घटनेच्या कलम ३४१ व ३४२ अनुसार केंद्रशासनाने अनुसूचित जाती-जमातींची यादी घोषित केलेली आहे. व्यक्तीची जात या घोषित केलेल्या यादीप्रमाणे असेल तर ती ज्या राज्याची रहिवासी असेल त्या भागासाठी (राज्यासाठी) ती व्यक्ती अनुसूचित जाती किंवा जमातीची सदस्य म्हणून गणली जाते. अनुसूचित जातींना हिंदू जातिव्यवस्थेमध्ये चार वर्णांच्या बाहेर ठेवले गेले होते. ह्या जातींना हजारो वर्षे दुर्लक्षित ठेवून दासांची कामे दिल्याने ह्या जाती उन्नत व प्रगत होण्याची कोणतीही शक्यता नव्हती. अनुसूचित जातीच्या सदस्यांना उच्च जातींनी केलेल्या शोषणामुळे व अस्पृश्यतेमुळे फार सोसावे लागले.
अनुसूचित जमातींना पूर्वी प्राचीन जमात, जंगल-जमात, पहाडी-जमात म्हणत. नागरीकरणापासून दूर वस्त्या, प्राचीन जीवन-पद्धती, भौगोलिकदृष्ट्या एकाकी, इतर मोठ्या समाजाशी संबंध फार कमी, वेगळी संस्कृती इत्यादी त्यांची वैशिष्ट्ये सांगता येतील. अनुसूचित जमातींना अनुसूचित जातींसारखा उच्च जातीच्या अस्पृश्यतेचा, शोषणाचा आणि भेदभावाचा सामना करावा लागला नाही. अनुसूचित जातींस दलित म्हटले जाते तर अनुसूचित जमातीस आदिवासी म्हटले जाते. हिंदू, शीख व बौद्ध धर्मातील व्यक्तीच फक्त अनुसूचित जातीची असू शकते. अनुसूचित जमातीसाठी असे कुठलेही बंधन नाही. एस.सी./एस.टी.च्या व्यक्तीने इतर जातीतील व्यक्तीशी लग्न केल्यानंतरही त्याची/तिची जात एस.सी/एस.टी.च राहते. एस.सी. आणि इतर जातीतील व्यक्ती यांच्या लग्नातून जन्मलेल्या मुलाची/मुलीची जात, वडिलांची जी जात असेल ती लागू होते. सर्व राज्यातील व केंद्रशासित प्रदेशातील अनुसूचित जातींची एकूण संख्या १२१५ आहे तर अनुसूचित जमातींची एकूण संख्या ७४७ आहे. महाराष्ट्नत अनुसूचित जातींची संख्या ५९ तर अनुसूचित जमातींची संख्या ४७ आहे.

७. भटक्या जमाती : (Nomadic Tribes - NT) स्वातंत्र्यपूर्व काळापासून उपजीविकेच्या शोधार्थ भटकी प्रवृत्ती असेल्या महाराष्ट्नतील जमातीस भटक्या जमाती म्हटले जाते. गोसावी, गारुडी, घिसाडी, गोंधळी, वंजारी, डोंबारी, वैदू, बहुरूपी, धनगर इ. महाराष्ट्नतील जातींचा यात समावेश होतो. या जातींमध्ये तीन गट पाडले गेले आहेत. भटक्या वंजारी जमातीस २%, भटक्या धनगर व तत्सम जमातीस ३.५%, व उरलेल्या १९९० पूर्वीच्या यादीनुसार
भटक्या जमातीस २.५% आरक्षण आहे.

८. विमुक्त जाती (Denotified Tribes - DT): - १९२४ च्या गुन्हेगारी कायद्याखाली गुन्हेगार म्हणून घोषित केलेल्या जाती. बेरड, भामटा, कैकाडी, लमाण, रामोशी, वडार, बंजारा, छप्परबंद इ. १४ जातींचा यात समावेश होतो. यांच्यासाठी ३% आरक्षण ठेवण्यात आलेले आहे.

९. इतर मागास वर्ग (ओ.बी.सी.) : अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती सोडून सामाजिकदृष्ट्या व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला जो वर्ग उरतो, त्यास इतर मागास वर्ग (Other Backward Class - OBC) म्हटले जाते. मंडल आयोगाने ३७४३ इतर मागासवर्गीयांची नोंद केलेली आहे. इतर मागासवर्गीयांसाठी असलेल्या राष्ट्नीय आयोगाने २१७१ प्रमुख ओबीसींची यादी जाहीर केलेली आहे. ह्यांतील उपजाती जमेस धरल्यास ही संख्या आणखीही वाढू शकते. आगरी, कुंभार, सोनार, कोळी, लोहार, शिंपी, माळी, बंजारा इत्यादी महाराष्ट्नतील अनेक जाती यामध्ये येतात. केंद्रशासनामध्ये या जातीस २७ टक्के तर महाराष्ट्न् राज्यात १९ टक्के आरक्षण आहे.

१०. विशेष मागास वर्ग (एस.बी.सी.) : महाराष्ट्न् राज्यातील अनुसूचित जाती-जमाती व इतर मागासवर्ग वगळता सामाजिक, आर्थिक व शैक्षिणिकदृष्ट्या मागासलेला वर्ग - यामध्ये गोवारी, कोष्टी, कोळी, व मुन्नेरवार या चार प्रमुख जातींचा यांत समावेश होतो. या वर्गास २ टक्के आरक्षण ठेवण्यात आलेले आहे.

११. पुढारलेल्या जाती (उच्च जाती) : हिंदू जातिव्यवस्थेमध्ये हा समाजगट जातीच्या उतरंडीमध्ये उच्च मानला गेला होता. ह्या उच्च जातींनी धर्माच्या व मनुस्मृती कायद्याच्या नावाखाली आपल्या सेवेसाठी ठरावीक व्यवसाय करायला भाग पाडले. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीयदृष्ट्या खालच्या जातींचे शोषण करून उच्च जाती पुढे आल्या - पुढारलेल्या झाल्या. यामध्ये बहुतांश राज्यांत आढळणारी ब्राह्मण जात, महाराष्ट्नतील मराठा जात, व इतर राज्यातील वैश्य, आर्य-वैश्य, जाट, राजपूत, रेड्डी, खत्री, गौडा, अरोड़ा, आगरवाल, नायर, नायडू/कायस्थ, कपू, वेलम्मा, वेल्लास, इ. वर्ग/जाती येतात. पुढारलेल्या जातींची लोकसंख्या १५ ते १९ टक्के या दरम्यान आहे.

१२. सकारात्मक कृती कार्यक्रम - Affirmative Action Programme :
पूर्वी झालेल्या भेदभावाची भरपाई म्हणून सध्या कमी प्रतिनिधित्व असलेल्या समाजगटांना शिक्षण, रोजगार आणि सरकारी ठेकेदारीमध्ये प्राधान्य/सवलत देण्याचा कार्यक्रम.

१३. क्रीमी-लेयर (Creamy Layer) : उन्नत-प्रगत व्यक्तींना/समाजगटांना आरक्षणाच्या सवलतीतून वगळण्यासाठी शासनाने ठरवलेला निकष.
सध्या हा निकष ओबीसींना लागू आहे. केंद्र शासनाच्या अखत्यारीतील नोकरीसाठीच्या आरक्षणासाठी व्यक्तीची वार्षिक उत्पन्नाची मर्यादा रु.२.५ लाख, तर राज्यशासनातील आरक्षणासाठी रु.४ लाख ठेवली आहे. हे उत्पन्न सलग तीन वर्षे ह्या मर्यादेपेक्षा कमी असल्यास ती व्यक्ती सवलतीस पात्र होते.

१४. गरिबी रेषा (Poverty Line) : प्रौढ व्यक्ती ग्रामीण भागात दिवसाला २४०० क्रॅलरीज व शहरी भागात २१०० क्रॅलरीज एवढे धान्य मिळण्यास समर्थ असणे. रुपयांमध्ये रूपांतर केल्यास डिसेंबर २००५ मध्ये प्रत्येक प्रौढ व्यक्ती महिन्याला ग्रामीण भागात रु. ३६८ व शहरी भागात रु. ५५९ मिळवण्यास समर्थ असल्यास ती गरिबी रेषेच्या काठावर आहे असे समजावे.
जागतिक बँकेची विकसनशील देशांसाठी गरिबी रेषेची व्याख्या आहे ती अशी : व्यक्ती दिवसाला एक डॉलरच्या वर कमवत असल्यास ती गरिबी रेषेच्या वर आहे असे समजावे.
वरीलपैकी एकाही व्याख्येत व्यक्तीच्या इतर आवश्यक गरजांचा (आरोग्य, शिक्षण, घर, कपडे) समावेश केलेला नाही.

Regards,

upkram

महाराष्ट्राचा आर्थिक आढावा

तांडा सुधार योजनेची खर्च मर्यादा ५ लक्ष वरुन १० लक्ष तसेच त्यासाठी २३ कोटी रुपयांची तरतूद
अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्ये

लमान तांड्यावरील युवती अभ्यासासाठी लंग्झबर्गकडे

सकाळ वृत्तसेवा:

लातूर - लातूर जिल्ह्यातील नांदुर्गा येथील लमान तांड्यावर राहणाऱ्या बबिता राठोड व तळणी येथील मागासवर्गीय कुटुंबातील शोभा सुरवसे या दोन युवती लग्झंबर्गला रवाना झाल्या आहेत. त्या तेथील सामाजिक परिस्थितीचा अभ्यास करणार आहेत. नारी प्रबोधन मंचमुळे त्यांना ही परदेशात जाण्याची संधी मिळत आहे.
नारी प्रबोधन मंचच्या वतीने लातूर व औसा तालुक्‍यात 35 गावांतून महिला, युवक युवती व बालकामगार या घटकांसोबत कार्य केले जात आहे. यात गावपातळीवर स्थापन झालेल्या युवती गटातील नांदुर्गाच्या बबिता राठोड व तळणीच्या शोभा सुरवसे या दोन मुलींना जर्मनीजवळ असलेल्या लग्झंबर्गला जाण्याची संधी मिळाली आहे. तेथील सामाजिक परिस्थितीचा त्या अभ्यास करणार आहेत. "तेरे डेस होम्स्‌ व एइआय लग्झंबर्ग या संस्थांच्या माध्यमातून ही संधी मिळाली आहे. याकरिता राज्यात कार्यरत असलेल्या संस्था प्रतिनिधींच्या गटातून अनेक युवतींना एकत्रित करण्यात आले होते. या प्रसंगी गावपातळीवर युवती मंडळाच्या माध्यमातून केलेले कार्य, या मुलींतील धाडस पाहून 36 मुलींची निवड करण्यात आली. लोकशाही पद्धतीने निवडणूूक घेऊन नंतर या दोघींची निवड झाली. एक मागासवर्गीय कुटुंबात जन्मलेली व दुसरी लमानतांड्यावर वाढलेल्या या मुलींनी परदेशात जाण्याच स्वप्नही पाहिले नव्हते. त्यांना मंचच्या कार्यामुळे परदेशात जाण्याची संधी मिळाली आहे. त्यांचे मंचच्या अध्यक्षा सुमती जगताप, हेमलता वैद्य, राधाकृष्ण देशमुख यांनी अभिनंदन केले.

नंदगुल तांड्याला लाभला परीसस्पर्श


एक महिला गावाला बदलू शकते, हे तुळजापूर येथील बोरदनवाडीतील इंदुमती राठोड यांना भेटले की पटते. अख्ख्या गावाला ग्रामस्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यापासून गावात स्वच्छतागृहे उभारणीपर्यंतच्या सर्व कामांमध्ये इंदुमती राठोड यांनी मोलाचा सहभाग दिला आहे.

या गावात गेले, की एकेकाळी हे गाव अस्वच्छ असेल असे वाटत नाही, इतके हे गाव चकाचक झाले आहे. इंदुमती राठोड या बोरदनवाडीतील नंदगुल तांड्यामधील अंगणवाडी पर्यवेक्षिका आहेत. नंदगुल तांड्याचा कायापालट करण्यासाठी त्यांनी अपार मेहनत घेतली. ग्रामपंचायतीचे मन वळवण्यापासून ते गावकऱ्यांना एकजुटीचे महत्त्व समजावून देण्यापर्यंतची कामे त्यांनी केली.

हे गाव रूढार्थाने स्वच्छ नव्हते. या गावात अस्वच्छतेचे साम्राज्य होते. हे गाव अतिशय दुर्गम भागात असून, गावाची लोकसंख्या सुमारे 800 ते 850 आहे. त्यामध्ये सुमारे 200 लोक ऊसतोडणी कामगार असल्यामुळे सहाशे इतकीच गावाची खरी संख्या आहे. या गावातील सुमारे 25 टक्के लोक ऊसतोडणीसाठी जातात. 30 टक्के लोक शेतकरी, तर उरलेले शेतमजूर आहेत.

गावची अस्वच्छता अनेक आजारांना आमंत्रण देणारी असते, त्यामुळे आपले गाव स्वच्छ करण्यासाठी काही पथदर्शक काम करण्याची गरज आहे, असे इंदुमती राठोड यांच्या लक्षात आले आणि तेथून सुरू झाली ती ग्रामस्वच्छतेची प्रक्रिया. कोणतेही मोठे काम ही एकट्यादुकट्याने करण्याची गोष्ट नसते, तसेच अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने एखादी गोष्ट केली, तरच त्याचे अपेक्षित पडसाद दिसू शकतात, हे कामाची जुळणी करताना इंदुमती यांच्या लक्षात आले.

तसेच कोणतेही मोठे काम करताना निधीही उपलब्ध असावा लागतो, त्याशिवाय ते काम करता येत नाही. या सगळ्याच गोष्टींसाठी इंदुमती यांनी काम करायला सुरवात केली. त्या निधीसंदर्भात पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी संगीता पाटील यांना भेटल्या. त्यांच्या कडून ग्रामस्वच्छता कार्यक्रमाची माहिती घेतली. संगीताताईंनी त्यांना ग्रामस्वच्छतेसंदर्भात वर्धा इथे होणाऱ्या अभ्यासदौऱ्यात सहभागी होण्यास सांगितले. त्यानुसार इंदुमतीताई या दौऱ्यात सहभागी झाल्या.

त्यांना या दौऱ्यामधून खूप शिकायला मिळाले. हा अभ्यासदौरा पूर्ण झाल्यानंतर स्थानिक पातळीवर ग्रामस्वच्छता कार्यक्रमाची गटप्रमुख म्हणून त्यांची निवड झाली. आपले घर, आपले अंगण आपण स्वच्छ ठेवतो, त्याप्रमाणे आपले गावही आपण स्वच्छ ठेवले पाहिजे, अशा शब्दांत गावकऱ्यांना त्यांनी स्वच्छतेचे महत्त्व पटवून द्यायला सुरवात केली.

तसेच घरात शौचालय नसेल, तर गैरसोय तर होतेच, पण असे गावही खूप दुर्गंधीयुक्त आणि अस्वच्छ असते. या परिस्थितीचा त्रास गावकऱ्यांनाच होतो, हेही त्यांनी या वेळी गावकऱ्यांना पटवून सांगितले. ग्रामसभेत हे विषय मांडायला त्यांनी सुरवात केली. सातत्याने ही गोष्ट कानांवर पडून गावकऱ्यांनी ग्रामस्वच्छता अभियानात सहभागी व्हायचे ठरवले. ग्रामस्वच्छता करायची हा निर्णय पक्का झाला, पण ग्रामस्वच्छता म्हणजे नेमकी कृती काय करायची, हा प्रश्‍न गावकऱ्यांना पडला.

तो सोडवण्याचे काम इंदुमतीताईंनी केले. त्यांनी ग्रामस्वच्छतेला सुरवात शौचालय बांधणीपासून करायची, असे गावकऱ्यांना सांगितले. हे काम आधी करण्याचे महत्त्वही पटवून दिले. ग्रामसभेत स्वच्छतागृहे असणे किती महत्त्वाचे आहे, हे समजावून सांगितले आणि गावात कामाला सुरवात झाली. त्यांनी स्वतः स्वच्छतागृहे उभारणीत पुढाकार घेतला. शौचालयांचे काम गावात सुरू झाले.

एका महत्त्वाच्या वळणावर गाव उभे राहिले, पण गावातील कचऱ्याचा, गटारांचा प्रश्‍नही होताच. केवळ स्वच्छतागृहे उभी करून गावाच्या स्वच्छतेचा प्रश्‍न सुटणार नाही, तर त्यासाठी हातात झाडू घेऊन गाव झाडायला हवे. गावातील राडारोडा साफ करायला हवा, उघडी गटारे बुजवायला हवीत आणि मुख्य म्हणजे आपण आपल्या हातांना शिस्तीची सवय लावून घ्यायला हवी.

आपल्या हातांना घरातील कचरा, खरकटे जर घराजवळील गटारात फेकायची सवय असली, तर ती आधी मोडायला हवी, हे समजावून सांगितले. त्यांच्या उत्तम भाषणशैलीमुळे त्यांनी सांगितलेली गोष्ट गावातील लोकांना पटली. त्या गावात बंजारा लोकांची संख्या अधिक असल्यामुळे गावकऱ्यांशी संवाद साधण्याकरिता त्यांनी बंजारा भाषेतून त्यांच्याशी बोलायला सुरवात केली. त्याचा परिणाम सकारात्मक झाला. गावकरी स्वच्छतेच्या कामाला लागले. ज्या गावात कामाच्या, रोजगाराच्या निमित्ताने एका गावातून दुसऱ्या गावात सतत स्थलांतर करणारे लोक असतात, त्या गावात स्वच्छता आणि शौचायलांची कामे करताना अनेक प्रश्‍न उभे राहतात.

भटक्‍या लोकांना इथे कायमचे राहायचे नसल्याने ते या सर्व उपक्रमात किती भाग घेतील, ही शंका उपस्थित होते. या गावाची परिस्थितीही साधारण तीच होती. तेवढाच प्रश्‍न पैशांचाही होता. गावाची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने शौचालये बांधायला पैसा कुठून आणणार, हो मोठा प्रश्‍न होता, पण इच्छा असेल तिथे मार्ग निघतो आणि माणसांची मनेही मोठी होतात, या गावातील दहा बचत गट गावाला भक्कम आर्थिक आधार द्यायला पाठीशी ठाम उभे राहिले.

गावातील आर्थिक बळ आणि एकजुटीतून हे गाव हगणदारीमुक्त झाले. त्याचबरोबर गावातील रस्ते स्वच्छ झाले. घाणीचे साम्राज्य नाहीसे झाले. लोकांनी आपल्याला स्वच्छताविषयक चांगल्या सवयी लावून घेतल्या. या सर्वांमागे या गावातील लोकांचा सहभाग मोलाचा आहेच, पण इंदुमती राठोड यांची दूरदृष्टी आणि चिकाटीही तेवढीच मोलाची आहे.

तांड्याची क्रांतीकारक पारुबाई राठोड




वीस वरीस मुंबईत कामं केली. मुंबईत कामं करुन थोडे थोडे पैसे जमवून गावी दहा एकर शेतजमीन विकत घेतली. मुंबईत काम मिळालं तिथं राहायचं. तिथलं काम संपलं की दुसरीकडं जायचं, यामुळं पोरांच शिक्षण व्हईना. त्यामुळं या सेवापूर तांड्यावर परत आलोत. पण येथेही अनेक समस्या. सेवापुरात काम नसल्यानं पहिल्यांदा हातावरची शिलाई शिकले. मग शिलाई मशीन घेतली. सामानासाठी पैसा जमा करण्यासाठी म्हणून वडवळ नागनाथच्या बँकेत खातं काढले. कुटुंबाची जबाबदारी माझी. मला पतीचा पाठिंबा. बँकेत महिलांच्या भेटी होत. एकदा बँकेत ममता कुलकर्णी बाईकडून बचत गटाची माहिती मिळाली. मग मीही बचतगट काढण्याचा निर्णय घेतला. आमची बंजारा माणसं दिवसभर ढोर मेहनत करुन पैसा कमावतात पण जमा करुन ठेवत नाहीत. कमाई खूप पण दारुत घालविण्याची सवय, हे थांबवून पैसा जमा करण्याची माझी आयडिया मी महिलांना सांगितली. त्यातून भिशी सुरु केली . भिशी परवडना, भांडण होऊ लागली म्हणून ती बंद केली .....

लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील सेवापूर तांड्यातील पारुबाई राठोड एका दमात हे सगळं सांगत होत्या. सायंकाळचे पाच ते साडेपाच वाजलेले. डोंगरांनी वेढलेल्या या तांड्यावर आम्ही पोहचलो. तांड्याचा रस्ता म्हणजे खूप त्रास होणार अशी माझी धारणा. पण वडवळ नागनाथ गावापासून तांड्यापर्यंतचा रस्ता डांबरीकरणाचा अन् उत्तम प्रकारचा. आमची गाडी बघून गावातील पोरं जमा झाली. आमची चौकशी त्यांनी सुरु केली. येण्याचा हेतू सांगताच पारुबाईच्या घरी घेऊन गेली नि पारुबाईशी ओळख करुन दिल्यानंतर त्या बोलू लागल्या.

भिशी बंद केल्यानंतर बचत गट स्थापन करण्याचा आम्ही महिलांनी निर्णय घेतला. सगळ्या जणींनी मिळून ५ हजार रुपये जमा केले. बँकेत गेलो तर मॉनेजरने एवढ्या ४० ते ४५ महिलांचा एक बचत गट करता येणार नाही, असे सांगितले. त्यानंतर १८-१८ महिलांचे दोन बचत गट तयार केले. तांड्यावरच्या बाया एकत्र येऊ लागल्या. आपला आर्थिक व्यवहार चोख ठेवू लागल्या. वायफळ खर्चाला आळा बसू लागला. नवर्‍याच्या दारुला पैसे देणे बंद झाले. गड्यांना कामांना लावून बायका बॉगा घेऊन हिंडू लागल्या. म्हणून तांड्यावरच्या गड्यामध्ये चर्चा सुरु झाली. घरातील वातावरण तापू लागले. म्हणून चार-पाच महिने बचत गटाचं काम बंद ठेवलं. मध्येच बँकेतून बोलावणे आले. गावातील वातावरणामुळं माझं टेन्शन वाढले. मी आजारी पडले. आपण चांगलं काम करत असल्यानंच आपल्याला नाव ठेवत आहेत, असाही विचार मनात येई. इंदिरा गांधीनांही सुरुवातीला लोकांनी नाव ठेवले असेल की, असंही मनात वाटे. अशातच पुन्हा बचत गटाचं काम सुरु केलं. बँकेनं दोन्ही बचत गटांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचं कर्ज दिलं. त्यात दहा हजाराची सबसिडी दिली. आम्ही बायकांनी या पैशातून कोंबड्या, शेळ्या घेतल्या. हे कर्ज वेळेत फेडल्यांनं बँकेने आम्हाला अडीच लाख रुपयांचं कर्ज दिलं. सेवालाल बचत गटाच्या १६ महिलांनी एक एक म्हैस घेतली. अडीच लाख रुपयांवर एक लाख रुपये सबसिडी मिळाली. आता चारा नसल्यानं म्हैशीचं दूध कमी झालयं पण काम करुन बँकेचा नियमित हप्ता आम्ही भरतोय.

आम्हां तांड्यावरच्या बायकांच्या दु:खाला आणि दारिद्र्याला खर्‍या अर्थानं दारुच जबाबदार असल्याचं मला नेहमी वाटत असे. येथील पुरुष खूप मेहनत करुन पैसा कमावतात आणि रात्री दारु पिऊन ते पैसे दारुत बुडवतात. पुन्हा कर्जबाजारी होतात. त्यातून मुलाचं शिक्षण करत नाहीत. त्यांनाही आपल्या मागे कामाला जुंपतात. गावात येणारी अवैध दारु बंद झाली तर तांड्यावरच्या संसारात सुख शांती येईल, असं वाटू लागलं. माझ्या घरात कोणीही दारु पित नव्हतं. परंतु काही वर्षापूर्वी सेवापूर तांड्यावर धर्मापुरीहून दररोज वाहनातून दारु यायची. त्यामुळं ही दारु वाहतूक बंद करण्याचा मी निर्णय घेतला. तांड्यावरच्या महिलांना सोबत राहण्याची विनंती केली.

एके दिवशी रात्री दीडच्या सुमारास दारु घेऊन जीप आल्याची माहिती मिळताच त्याच रात्री शेजारच्या चार पाच महिलांना झोपेतून उठविलं. सगळ्या महिलांना उठविल्यास कुत्रे चावतील अशी भितीही वाटली. चार पाच महिलांना सोबत घेऊन रोडवर जाऊन जीप पुढे उभे राहिले. जीपवाल्यानं जीप समोर आणून उभी केली. माझा जीव गेला तरी चालेल पण उद्यापासून तुझी जीप दारु घेऊन येणं बंद झाली पाहिजे. असे म्हणून दोन हातात दगड घेऊन तशीच उभी राहिले. इतर महिला बाजूला होत्या. जीपवाल्यानं बाजूनं जोरात जीप काढून नेली. मी जीपवर दोन दगड घातले. जीपच्या काचा फुटल्या. जीप माळाच्या कपारीला धडकली. जीपचालक जीप सोडून पळून गेला. अन् तेव्हापासून तांड्यावरती दारु येणं बंद झालं, आता तांड्यावर कुणी दारु पीत नाही.

बोलता बोलता पारुबाई थांबतात. शेजारी बसलेल्या नातीच्या केसावरुन हात फिरवतात. अंतर्मुख होऊन थोड्या गंभीर होतात. पण आणखी खूप काही करण्याचा आत्मविश्वास त्यांच्या डोळ्यातून तरळतो. सायंकाळच्या वातावरणातील गारवा लक्षात घेऊन त्या सुनेला चहा करण्यास सांगतात. दारुबंदी, बचत गट चळवळ यासह कौटुंबिक वाद, विधवांचे प्रश्न, अज्ञानात पिचत पडलेल्या समाजाला शिक्षण घेण्यास प्रवृत्त करण्यासाठी पारुबाई राठोड यांनी पुढाकार घेतल्याचे वाचले होते. त्याबद्दल विचारले असता त्या सांगू लागतात. खरं तर मुलाच्या शिक्षणासाठी आम्ही मुंबई सोडून सेवापूरला आलो. पण येथे चौथीपर्यंतच शाळा. या पुढच्या शिक्षणासाठी वडवळ नागनाथ या तीन किलोमीटरवरच्या गावी जावे लागते. पण गावाबाहेर जाण्यास रस्ता नव्हता. पावसापाण्यात मुलांना कसे पाठवावे असा प्रश्न पडला. मधे मी गावच्या ग्रामपंचायतीत निवडून आले. जिल्हा परिषदेत प्रयत्न करुन गावचा रस्ता मंजूर करुन घेतला. त्याचं चांगलं काम झालं. त्यामुळे मुलं बाहेरगावी शिक्षणास जाऊ लागली. गावातील शाळेत बायका मुलाना पाठवित नसल्याचं लक्षात येताच बायकांना प्रोत्साहित केलं. मुलांना शाळात पाठविण्याची विनंती केली. शाळा समितीची सदस्य असल्यानं आणखी पुढाकार घेतला. पूर्वी शाळेत केवळ १०-१५ विद्यार्थी असतं. आता ही संख्या ६० ते ६५ वर गेली आहे.

पारुबाई राठोड यांचं शिक्षण झालं नाही. पण नवसाक्षर वर्गातून जाऊन त्या सही करण्यास शिकल्या आहेत. त्यामुळं त्या आज शिक्षण समिती सदस्य , महिला जनसत्ता आंदोलन, पंचायत आघाडीप्रमुख, तंटामुक्त समिती सदस्य, लातूर येथील सावित्रीबाई फुले गायरानधारक बँकेच्या उपाध्यक्षा अशा विविध पदावर यशस्वीपणे काम करीत आहेत. मूळात बचत गटाच्या कामातूनच समाज कार्याची आवड निर्माण झाल्याचं त्या सांगतात. त्यांच्या बचतगटाच्या कामामुळं सेवापूर तांडा आता सावकाराच्या पाशातून मुक्त झाला आहे. तांड्यावर पैशाची अडचण आल्यास महिला बचत गटातर्फे मदतीचा हात पुढे केला जातो. गावातील रास्त भाव दुकानाचा माल गावात येतच नव्हता. ही बाब ध्यानात येताच दुकानदाराच्या मागे लागून रास्त भाव दुकानदाराचे धान्य आणि इतर साहित्य गावात येऊ लागले.

तांड्यावर सुरक्षा दलाची स्थापना केली. तांड्याचा नियोजनबध्द पध्दतीने विकास करण्याचं काम केले. जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, वैद्यकीय अधिकारी, विशेष समाजकल्याण अधिकारी यांच्या माध्यमातून विविध योजना तांड्यावर आणल्या. तांडा सुधार योजनेतून तांड्यावर सिमेंटचे रस्ते तयार केले. पाण्याची व्यवस्था केली. महिलांच्या प्रसुती सुरक्षित व्हाव्यात म्हणून जननी सुरक्षा योजनेत आता प्रत्येक महिलेचे प्रसुती त्या दवाखान्यात करुन घेतात. प्रकाश रेड्डी आणि अरुण रेड्डी यांच्या धरतीबचाव आंदोलनातून खूप काही शिकावयास मिळालं, महिला जनसत्ता आंदोलनातून महिलांच्या हक्काची जाणीव झाली. या व्यासपीठावरुन महाराष्ट्रभर दौरे केले. महिलांच्या मेळाव्यातून भाषणं केली. पुरस्कार मिळाले. शाळेत मुलांच्या नावापुढे वडिलांबरोबरच आईच नाव टाकण्यात पुढाकार घेतला. शेताच्या सातबारा उतार्‍यावरही महिलांची नाव टाकून घेतली, असं सहजपणानं पारुबाई सांगत होत्या.

'महिला सक्षम झाली तर कुटुंब सुखी होईल' , असं आपणास वाटतय. असंही सांगायला त्या विसरल्या नाहीत. पारुबाईंना अलिकडेच लातूर येथील ऊर्जा फाऊंडेशनचा अग्निशिखा पुरस्कार देण्यात आला. पाच हजार रुपये रोख, सन्मान चिन्ह आणि गौरव पत्र असं या पुरस्काराचं स्वरुप होतं. यापूर्वी त्यांना कुसुमताई चौधरी महिला कल्याण पुरस्कारानंही गौरविण्यात आलं आहे. दर्‍या कपारीत राहून स्वत:ची वेगळी वाट चोखाळणार्‍या पारुबाई ग्रामीण भागातील तमाम महिलांसाठी नक्कीच आदर्श आहेत.
Regards,
Maimarathisanstha.

विजेअभावी पाचेगाव परिसरातील बंजारा तांडे अंधारात गेवराई,


सततची वीजकपात व अपुरा वीजपुरवठा यामुळे पाचेगाव तसेच परिसरातील नऊ बंजारा तांडे कायमस्वरूपी अंधारात आहेत.
वीस हजार लोकवस्तीच्या गावात केवळ दोनच ठिकाणी सिंगल फेजिंग केल्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यातील पाचेगाव महसूल मंडळाचे गाव आहे.
या गावच्या शिवारात दामू नाईक तांडा, चाकू तांडा, बेली तांडा, पवारवाडी, रेखानाईक तांडा, चव्हाणवाडी, जयराम तांडा, वसंतनगर असे नऊ बंजारा तांडे आहेत. या ठिकाणी २० हजार लोकसंख्या असूनही केवळ दोन ठिकाणी सिंगल फेजिंग यंत्रणा बसविण्यात आली आहे.
ग्रामीण भागात बारा-बारा तासांहून अधिक वेळ वीजकपात असते. या व्यतिरिक्तही वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे या गावांच्या नागरिकांना रात्रंदिवस वीजटंचाईचा सामना करावा लागत आहे.
रात्रीच्या वेळीही वीजपुरवठा होत नसल्याने अंधार असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होते. वीजटंचाईचा परिणाम जनावरांच्या पिण्याच्या पाण्यावरही होत आहे.
विजेअभावी पिठाच्या गिरण्याही बंद राहत असून घरात धान्य असूनही पीठ नसल्याची परिस्थिती निर्माण होत आहे. विद्युत वितरण कंपनीकडे वारंवार पाठपुरावा करूनही अधिकारी गांभीर्याने घेत नाहीत.
येत्या १५ दिवसांत सिंगल फेजिंग करून वीजपुरवठा सुरळीत करावा अन्यथा बंजारा सेवा संघर्ष समितीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संतप्त रहिवाशांनी कार्यकारी अभियंत्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
Regards,
loksatta.

New Book: "Change and Development in Lambani Society" written by C.R. Gopal

Change and Development in Lambani Society: C. R. Gopal; IBH Prakashana, 77, 2nd Main, Ramarao Layout, BSK III Stage, Bangalore-560085.

Shri Mata Durgadevi Annual Yatra Mahotsav 2009 at Somdevarhatti Tanda, Bijapur

Shri Mata Durgadevi Annual Yatra Mahotsav 2009 at Somdevarhatti Tanda, Bijapur


Banjara Saint Shri Ramrao Ji Maharaj addressing the gathering of Banjara devotees at the Temple premises of Shri Mata Durgadevi Jathra Mahotsava Devastan Trust, Somdevarhatti Tanda, Bijapur, Karnataka on June 22, 2009. Shri Hari Bhau Rathod, Ex M.P. Yavatmal also seen in the picture. This programme was organized by Shri Jaganu Maharaj, Chairman, Shri Mata Durgadevi Jathra Mahotsava Devastan Trust Committee, Somdevarhatti Tanda, Bijapur, Karnataka. (Photo and details by Shankar Ade) For More Photos, Please click on this link:click here

Any Goaars living in Australia Contact me: Dr. Indeevar Mude, Melbourne, Australia

I will be interested in catching up of any Goaars living in Australia whether it be students or any one who is in Australia or coming to Australia and I shall help out in what ever way best possible with me.
I will be looking forward for hearing from you.

Kind Regards,
Dr. Indeevar Mude
MBBS DA FRACGP
Melbourne, Australia.
E-mail: indeevarmn@gmail.com

Hand Paintings

Gormati Headline Animator

Bookmark and Share
zwani.com myspace graphic comments Badshah Naik